कोल्हा आणि उंट
एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता. एक दुष्ट कोल्हा त्याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवतात येईल? एकदा त्याने उंटाला विचारले "काका,रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का?" उंट म्हणाला "बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे.या जंगलात दुसरे काय मिळणार. तेव्हा कोल्हा म्हणाला "मी तर रोज जवळच्याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात." उंटाला ही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ह्याला त्याने तेथे नेण्यासाठी विनंती केली.
कोल्हा शरीराने लहान होता.त्याचे पोट लगेच भरले. मग कोल्ह्याने जोराने कोल्हेकुई सुरू केली. कोल्ह्याचा आवज ऐकताच शेताचा मालक व त्याचे चार गडी शेतात घुसले.त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली.व जंगलात पळून गेला. पण बिचारा उंट पळता न आल्यामुळे तेथेच अडकून बसला. शेतकऱ्याने उंटाला बेदम मारहाण केली. त्याला मार खाताना पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला. या गोष्टीला काही दिवस गेले. कोल्ह्याने उंटाला परत एकदा फसवू पुन्हा शेतात नेले. व पुन्हा एकदा उंटाला मार पडला दरवेळी आपल्यालाच मार पडतो,ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली. व त्याने त्याची खोड मोडण्याचे ठरवली. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला.व जंगलामध्ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदली मधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपवली सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्हा कोल्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेऊन बुक्की मारली.कोल्हा पाण्यात बुडून मरण पावला.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
चैताली शेखर चव्हाण
ReplyDeleteछान आहे गोष्ट
ReplyDeleteKhup chan
ReplyDeletePost a Comment